नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : रथ चौक राम मंदिर परिसरातील गेल्या दोन वर्षापूर्वी महापालिकेने धोकेदायक इमारत पाडले होते मात्र तिचा अंशतः काही भाग तसाच राहिला होता. त्यातला काही भाग मध्यरात्री कोसळल्याने या ठिकाणी लावण्यात आलेल्या चार चाकी वाहनाचा मोठे प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. यापूर्वी अनेक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या मात्र यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे . तसेच या परिसरात महानगरपालिकेची शालेय इमारत आहे ती देखील पूर्णता जीर्ण झाली आहे.शाळेसह आजूबाजूच्या अनेक इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधित इमारतीबाबत यापूर्वीही महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. व जीर्ण इमारतीचा काही भाग मध्यरात्री अचानक कोसळल्याने खाली उभ्या असलेल्या रत्नेश निकम यांच्या चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रथ चौक परिसरातील महानगरपालिका शाळेसह आजूबाजूच्या अनेक इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधित इमारतीबाबत यापूर्वीही महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून संबंधित धोकादायक इमारतीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, ही जीर्ण इमारत हरिश्चंद्र भोजू बर्डे यांची असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ते काही वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास आहेत. शेजारील नागरिकांनी इमारतीला तडे गेल्याची माहिती देत लक्ष देण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
इमारतीच्या काही भिंतींची पडझड झाली असून मोठमोठे तडे गेले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही इमारत कधीही पूर्णपणे कोसळू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.





