नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘गती’चे संचालक देवदत्त चारुदत्त गोखले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कॉमर्स अँड मॅनेजमेंट विद्याशाखेअंतर्गत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी पीएच.डी. नोटिफिकेशन स्वीकारले.
देवदत्त गोखले यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यांद्वारे प्रकट होणारी समकालीन कार्यसंस्कृती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयावर संशोधन पूर्ण केले. या संशोधनासाठी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. विशाल सुनील राणा आणि संचालिका प्रा. (डॉ.) प्रीती अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले.
या संशोधनाचा उपयोग कॉर्पोरेट, शैक्षणिक, सामाजिक तसेच लोककल्याणाच्या विविध क्षेत्रांसाठी होईल, असा विश्वास देवदत्त गोखले यांनी व्यक्त केला. तसेच खानदेशातील सुप्रसिद्ध आणि पहिले चार्टर्ड अकाउंटंट तसेच माजी आमदार प्रा. पी. डी. दलाल यांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
संशोधन पूर्ण करताना अनेक व्यक्ती व संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) एस. टी. इंगळे, प्राचार्य अनिल राव, प्रा. चारुदत्त गोखले, प्रा. (डॉ.) अनिल डोंगरे, प्रा. (डॉ.) समीर नारखेडे, प्रा. (डॉ.) प्रीती अग्रवाल, प्रा. (डॉ.) संजय शेखावत, डॉ. विशाल राणा तसेच सौ. रश्मी गोखले उपस्थित होते.






