नवराज्य Live न्यूज नेटवर्क
शेरी : ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेकडून प्रदान करण्यात आलेला “राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार २०२६” हा प्रतिष्ठेचा बहुमान ग्रामपंचायत शेरी गावाला प्राप्त झाला आहे. या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामपंचायतीच्या विकासकामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा कैलास पाटील, उपसरपंच भिकन भाईदास सपकाळे तसेच सदस्य विमलबाई देविदास चौधरी, मधूकर दौलत कुमावत, प्रभाकर युवराज कुमावत, अमोल बाबुराव पवार, ताईबाई बापू सोनवणे, शाताबाई बापशिवाजी पवार आणि अश्विनी नितेश पाटील यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या पुरस्कारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच ग्रामसेवक, शिपाई, गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






