नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी – नीट परीक्षा दिल्यानंतर पेपर चांगले गेले असल्याने 720 पैकी 652 गुणाचा पेपर लिहिण्याचा आनंद कॅडबरी खाऊन साजरा करत असतांनाच, नीट परीक्षा रद्द झाल्याचे कळताच, क्षणार्धाच आनंद दुःखद बदलला, विद्यार्थीसह टीचरही ढसाढसा रडल्या. हा क्षण विद्यार्थ्यांसाठी खूपच वेदनादनदायी ठरला आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप वेदनादायी प्रसंगातून जावं लागत आहे. रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करत परीक्षा दिली होती. व त्यात अपेक्षेप्रमाणे चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परंतु पेपर फुटीच्या कारणाने रद्द झालेल्या या नीट परीक्षेमुळे विद्यार्थी खचलेला आहे.
जेईई, ऍडव्हान्स सीईटी IIT यासारख्या परीक्षा ऑनलाईन होतात.मग वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली ही नीट परीक्षा ऑफलाइन का?
गेल्या दोन वर्षांपूर्वी 2024 मध्ये याआधी देखील नीट परीक्षा चा पेपर फुटला होता. त्यावेळी शंभर विद्यार्थी 720 पैकी 720 गुणाने उत्तीर्ण झाले होते. व त्याच पद्धतीची पुनःनावृत्ती 3 मे रोजी.झाली आहे. या परीक्षेत 200 प्रश्न एका प्रायव्हेट 200 प्रश्न अंदाजे दिले होते त्याप्रमाणे तसेच त्यापैकी एक पासून सिरीयल प्रश्न जशीच्या तशी पडले होते. परीक्षानंतर ही बाब उघड झाल्यानंतर यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागल्या. मात्र केंद्राने ही परीक्षा निकाल लागल्यानंतर रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

आम्ही विद्यार्थ्यांना परीक्षा चांगली गेल्याने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत होतो. त्यांना कॅडबरीचा घास भरून आनंद साजरा करत होतो. व त्याच दरम्यान परीक्षा रद्द झाल्याचा निरोप आल्याने, आमचा आनंद क्षणातच पाण्यात विरून गेला. मुलांनी रात्र दिवस करून अभ्यास करून खात्रीशीर गुण मिळतील अशी तयारी केली होती. परंतु परीक्षा रद्द झाल्याने मुलांना अश्रू अनावर झाले व आम्ही सगळे या प्रसंगाने खचून गेलो आहोत. पुन्हा विद्यार्थ्यांचे मनोबल तयार करावे लागेल. जेईई -सीईटी ऍडव्हान्स परीक्षा ऑनलाईन होतात. मात्र डॉक्टरांचे भवितव्य ठरणाऱ्या,महत्त्वाची नीट या परीक्षा ऑफलाइन का होतात. ह्या परीक्षादेखील ऑनलाईन झाल्या पाहिजेत जेणेकरून हुशार विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही.
– प्रा.सविता वाणी
जयीष्णू IIT गुरुकुल
जळगाव.

नीट परीक्षा ऑनलाईन घेतल्यास यात पारदर्शकता येईल व ज्यावेळी पेपर लिक होतो, असे जरी कळले तरी सरकारचे इंटेलिजन्स हे तात्काळ पेपर चेंज करून करू शकतात. माझा मुलगा लातूरला दोन वर्षापासून मेहनत घेत आहे.परीक्षा आटोपल्यानंतर थोडा त्यांना तणाव मुक्त करण्यासाठी तो केदारनाथला गेला. परंतु आज नीट परीक्षा रद्द झाल्याचे ऐकून धक्का बसला. आता त्याला पुन्हा लातूरला जावे लागणार त्याच्यामुळे किती भुदंड बसणार आहे. त्याबरोबरच त्याची मानसिकता देखील खराब झाली आहे. त्यांना एका भयंकर खेळापासून सुरुवात झाली. पेपर फुटला तेव्हाच रद्द करायला हवा होता. म्हणजे विद्यार्थ्यांवर फारसा ताण आला नसता. परंतु आता इतके दिवस निघून गेल्यानंतर त्यांच्या निकाल लागल्यानंतर परीक्षा रद्द होते हे किती भयंकर आहे.
– डॉ निलेश चांडक (कॅन्सरतज्ञ)
NEET विद्यार्थी पालक







