
जळगाव योगेश सुने
जळगाव शहर महानगरपालिकेची आज स्थायी समितीची सभा पार पडली. यात जळगाव शहरातील मोबाईल टावर कडील असलेल्या 28 कोटीच्या थकबाकी व भुयारी गटारीच्या जोडणीवरून स्थायी समिती सदस्य नितीन लढ्ढा यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मोबाईल टावर कडील सन 2026 -27 पूर्वीच्या केलेल्या आकारणी थकीत रक्कम 28 कोटीच्या जवळपास थकीत झाली असून. आणि वर्षानुवर्षे टेलिकॉम कंपन्या महापालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोत असलेला भाग असून उत्पन्न पासून महापालिकेला वंचित ठेवत आहेत. यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून त्यामुळे महापालिका प्रशासनाने शासनाची पत्रव्यवहार करून कठोरातली कठोर पाऊल उचलावी अशी सूचना लड्डा यांनी स्थायी समिती सभेत केली आहे.

भूमिगत गटारीचे कनेक्शन जोडण्यात नागरिक उदासीन
ज्या प्रभागात भुयारी गटारीचे काम बाकी आहे. त्या भागात सुमारे 29 लक्ष रुपयाच्या नवीन गटारी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र ज्या शहरातील भूमिगत गटारीचे काम गेल्या दोन वर्षापासून कार्यान्वित झालेले असून, नागरिकांकडून मात्र शहरात गटारीच्या जोडण्या 20 टक्के एवढी झाली असून,अद्यापही 80 टक्के जोडणी बाकी आहे. उदासीन नागरिक व धीम्म प्रशासनामुळेच हे काम रखडले आहे. असे नितीन लढ्ढा यांनी स्थायी समिती सभेत बोलताना सांगितले स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.







