• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कृषी

“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आरोग्य धोक्यात; सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 19, 2026
in कृषी, जिल्हा
“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे भविष्यात मानवी आरोग्यासमोर गंभीर प्रश्न उभा राहू शकतो. अशा परिस्थितीत मातीचे आरोग्य सुधारून अन्नाची गुणवत्ता वाढविणे अत्यंत गरजेचे असून, दुर्धर (जीवनशैलीशी संबंधित) आजार रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन डॉ. निलेश चांडक यांनी केले.रावेर येथे ‘भूमी सुपोषण अभियान’ निमित्त आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मातीतील सेंद्रिय घटक कमी होत असल्याने उत्पादनाची गुणवत्ता घसरत आहे. यामुळे अन्नातील पोषकतत्त्वे कमी होऊन विविध आजारांचा धोका वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती, संतुलित खत व्यवस्थापन आणि माती परीक्षण यावर भर देणे काळाची गरज आहे.जळगाव जिल्ह्यात ‘भूमी सुपोषण अभियान’ची जोरदार तयारी सुरू असून, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी देशाचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत या व्यापक अभियानाचे राष्ट्रीय पातळीवर उद्घाटन अमळनेर येथे होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

या अभियानाच्या निमित्ताने अक्षय कृषी परिवारच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अमळनेर येथे उद्घाटनानंतर संपूर्ण देशभरात एक महिन्याभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘भूमी सुपोषण अभियान’ राबविण्यात येणार आहे. यात माती परीक्षण शिबिरे, सेंद्रिय शेती मार्गदर्शन, शेतकरी मेळावे आणि कृषी तज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश असेल.

यावेळी डॉ. निलेश चांडक यांनी कॅन्सर तज्ञ म्हणून आपले अनुभव मांडताना सांगितले की, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे तरुण वयातही कॅन्सरचे प्रमाण वाढत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. भविष्यातील पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ‘भूमी सुपोषण अभियान’मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व सेंद्रिय व शाश्वत शेतीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

या कार्यक्रमाच्या वेळी तालुका कृषी अधिकारी श्री. वाळके सर, मंडळ कृषी अधिकारी रावेर श्री. केचे सर, कृषी अधिकारी रावेर श्री. महाजन सर, मंडळ कृषी अधिकारी सावदा श्री. गायकवाड सर, मंडळ कृषी अधिकारी पाल श्री. काळे सर तसेच सुरेश धनके, संदिप सावळे, अरविंद देशमुख, अश्विन शैदाने, कृषी विभागातील कर्मचारी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अभियान यशस्वी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला

बातमी शेअर करा !
Tags: अभियानआरोग्य बातमीकृषीकृषी बातमीकॅन्सरकॅन्सर तज्ञडॉक्टर निलेश चांडकदुर्धर आजारभूमीमाती परीक्षण
Previous Post

एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी! 

Next Post

महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026
महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

March 19, 2026
“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

“कॅन्सर” ला रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ आवश्यक – डॉ. निलेश चांडक

March 19, 2026
एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी! 

एक गुढी चिऊताईच्या संवर्धनासाठी! 

March 18, 2026
गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

गॅस सिलिंडर टंचाईविरोधात शिवसेनेचे काळ्या पट्ट्या  बांधून निषेध आंदोलन!

March 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif