नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव- चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या ४२ व्या वार्षिक महाराष्ट्र राज्य आणि लोकप्रशासन परिषदेत जळगावच्या पौर्णिमा देशमुख यांनी सुवर्णयश संपादन केले आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी या विषयावर सादर केलेल्या उत्कृष्ट शोधनिबंधासाठी त्यांना कॉम्रेड प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरण पुरस्काराने प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
६ आणि ७ फेब्रुवारी रोजी आयोजित या परिषदेत राज्यभरातून एकूण ४० शोधनिबंध सादर करण्यात आले होते. या चुरशीच्या स्पर्धेत पौर्णिमा देशमुख यांनी आपल्या विषयाची मांडणी अत्यंत प्रभावीपणे केली. परिषदेचे प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे यांच्या हस्ते त्यांना ३००० रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पौर्णिमा या प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी.चे संशोधन करत आहेत. त्यांच्या या यशात प्राचार्य डॉ. मनोहर पाटील संभाजीराव पाटील, अतुल ठोके, सीमा ठोके, मोहित ठोके आणि प्रा. वकार शेख यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. पौर्णिमा या प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख आणि सीमा देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
—-







