नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – भरारी फाउंडेशन व क्रेडाई जळगाव आयोजित “बहिणाबाई महोत्सव ११ वे पर्व च्या तिसऱ्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार यांना “बहिणाबाई गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सह विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय देशभक्त प्रख्यात प्रवक्ते सत्यनारायण बाबा मोर्य यांनी वाणीने उपस्थित यांना जागृती पर मार्गदर्शन केले.
महोत्सवात यांचा झाला सन्मान
समाजसेवेचा आणि आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात शैक्षणिक क्षेत्रातील नंदलाल गादिया, सामाजिक क्षेत्रातील राजेंद्र देशमुख, औद्योगिक क्षेत्रातील किशोर ढाके, आरोग्य क्षेत्रातील भारती काळे, सामाजिक क्षेत्रातील सरिता खाचने, पर्यावरण क्षेत्रातील वसंत पाटील, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. निलेश चांडक आणि उद्योग क्षेत्रातील किरण बच्छाव यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण…
या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी रोहन घुगे उद्योजक रजनीकांत कोठारी माजी.आमदार मनीष जैन, अनिश शाह, डॉ पियुष दोशी,गोसेवक अजय ललवाणी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, क्रेडाइचे जिल्हाध्यक्ष दीपक सराफ, उद्योजक अनिल कांकरिया, उद्योजक रवींद्र लड्ढा, यांचे उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर विनोद ढगे यांनी केले.
कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक – सत्यनारायण बाबा मोर्य
पूर्वी कॅन्सर हा आजार अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकांना होता. मात्र आता या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे याला आपली जीवनशैली जबाबदार आहे. पूर्वी आपण सोने,चांदी,पितळाच्या व तांब्याच्या पातेल्यात अन्नपदार्थ शिजवून खायचे मात्र आता अल्युमिनियम व प्लास्टिक मध्ये पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका अधिक प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर पूर्वी आपण लहान असताना जेवणासाठी आईच्या मागे लागायचो. मात्र आता मुलांच्या मागे आई जेवण घेऊन धावते. मात्र तरी त्याला जेवायची इच्छा होत नाही.त्याचे लठ्ठ शरीर व डोळ्यावर चष्मा अशी आताच्या पिढीची परिस्थिती आहे. सकस आहार व व्यायामाचा अभाव असून हे भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे.असेही बाबा यांनी सांगितले. गंगा नदीच्या प्रदूषण व सर्रासपणे होणारी वृक्षांची कत्तल यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून, याचे रक्षण करायला हवे. ही सर्वांची जबाबदारी आहे असेही बाबा यांनी सांगितले.







