महापालिका निवडणुकीत ३२१ उमेदवार रिंगणात
निवडणुकीच्या रिंगणातून ६५० उमेदवारांपैकी ३१७ उमेदवारांची माघार. ; १२ उमेदवार बिनविरोध
जळगाव प्रतिनिधी – जळगाव शहर महानगरपालिका निवडणुक च्या अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. निवडणुकीसाठी एकूण ६५० इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. असून त्यापैकी ३१७ आज उमेदवारांनी माघार घेतली असून महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध विजय झाले आहेत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर 321 उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
आज माघारीचा शेवटचा दिवस होता माघारी नंतर रात्री उशिरापर्यंत फायनल उमेदवारांची यादी तयार करण्यात आली.
आज सकाळपासून माघार घेण्यासाठी उमेदवारांनी महापालिकेत गर्दी केली होती. आजच्या माघारीनंतर 3२१ उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. उद्या फायनल यादीतील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दिनांक १५रोजी महापालिका साठी मतदान होईल व १६ रोजी निकाल घोषित होणार आहे.







