जळगाव – योगेश सुने (चीफ एडिटर )
जळगाव शहर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीने बिनविरोधचा धडाका लावला. महापालिकेत मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू अरविंद देशमुखांच्या एन्ट्री ने शहरात मात्र जामनेर पॅटर्नची चर्चा जोर धरू लागली. त्यात संजय सावतांनी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप केला तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोप फेटाळत. महायुतीचे अजून काही उमेदवार बिनविरोध होतील. भाजपाने एक उमेदवार बिनविरोध निवडून आणला. तर शिवसेनेने तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेनेच्या अजून दोन ते तीन जागा बिनविरोध होतील. असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवराज्य लाईव्हशी बोलतांना सांगितले.
उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार नॉटरिजिबल
संजय सावंत यांनी आपण मुंबई निघालो होतो. दुपारी उबाठाच्या उमेदवारांवर दबाव येत असल्याचा निरोप मिळाला व आपण जळगावात आलो. शिवसेना उबाठाचे संपर्क प्रमुख यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बेपत्ता असून ते आमच्या संपर्काच्या बाहेत आहेत. महायुती उमेवारांवर माघारीसाठी दबाव आणत असल्याचा आरोप केला.
कोणत्याच उमेदवारांवर दबाव नाही – मंत्री गुलाबराव पाटील
आम्ही कुणावरही दबाव आणला नाही. ज्या जागा बिनविरोध होत आहेत. ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढण्यासाठी कमी पडत आहेत. आणि जे सक्षम नाहीत. ते स्वतः आमच्या कडे येऊन माघार घेत असल्याचे सांगितले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना सांगितले.
शिवसेनेचे एकूण चार ते पाच नगरसेवक बिनविरोध होतील किंवा त्यापेक्षा अधिक बिनविरोध होतील असे सूचक व्यक्तव्य त्यांनी यावेळी केले.
जामनेर पॅटर्नची चर्चा जोरात..
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधूम सुरू असताना अर्ज छाननीच्या दिवशीच बिनविरोधची फिल्डिंग लागली.भाजपने आपला पहिला उमेदवार बिनविरोध काढला. तर दुसऱ्या दिवशी शिवसेनेने तीन उमेदवार बिनविरोध केले. भाजप आज काही उमेदवार बिनविरोध निवडणून आणणार असून मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहाय्यक अरविंद देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले जळगावात जामनेर पॅटर्न राबवला जाईल अशी चर्चा आता जोरधरू लागली आहे.
माघारीचा आज शेवटचा दिवस दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ.
माघारीचा आज शेवटचा दिवस असून सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत माघार होणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच कुणाची होणार माघार?किती जागा होणार बिनविरोध? जळगाव देखील माघारी साठी उचलून आणणार का? साम-धाम दंड भेद चा वापर होतोय का? आज दुपारी तीन नंतर सर्व चित्र स्पष्ट होऊन या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
पोलीस प्रशासन आपली भूमिका चोख बजावतील
आज माघार असल्याने उमेदवारांवर दबाव तंत्राचा वापर होत असून त्यांना बेपत्ता केले जात असल्याचा आरोप शिवसेना उभाठाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला. तर ज्याप्रमाणे जामनेरात माघारी साठी उमेदवाराला उचलून आणून जबरदस्तीने माघार घेण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. व जळगाव देखील जामनेर पॅटर्नची चर्चा जोर धरू लागल्याने असे झाल्यास पोलीस प्रशासनाचा देखील कस लागणार आहे.







