नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली असून
इच्छुकांचे अर्ज पाहता पक्षीय अर्ज भाजपा 13, शिवसेना (शिंदे गट) 6, काँग्रेस 1, व अपक्ष 5 यांनी नामनिर्देशन अर्ज केले दाखल. 25 असे एकूण पक्षांतर्फे 25 अर्ज दाखल करण्यात आले आहे. ज्यांनी पक्षातर्फे अर्ज दाखल केले त्यांनी आपल्याला आश्वासन मिळाले असल्याचे सांगत अर्ज दाखल केला आहे. मात्र युतीचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे आश्वासित उमेदवार अद्यापही संभ्रमात आहेत.
2054 अर्जाची विक्री झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 25 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. कार्यालयात अर्ज घेण्यासाठी व दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती.निवडणुकीच्या प्रक्रियेत अर्ज विक्रीला मोठ्या प्रमाणात झाली. यात तीन दिवसात 1 हजार 819 अर्ज उमेदवारांनी घेतले तर शनिवारी देखील 235 जणांनी विकत घेतल्याने 2 हजार 54 अर्जाची विक्री झालेली आहे.
या इच्छुकांनी भरले नामनिर्देशन अर्ज
प्रभाग 1 (ड) मधून गोकूळ चव्हाण, 2 (ब) पायल दारकुंडे, (ड) नवनाथ दारकुंडे, 7 (ब) शोभा पाटील, 12 (अ) सुरेखा तायडे, (ब) उज्वला बेंडाळे यांनी एक पक्षाकडून एक अपक्ष अर्ज भरला आहे. प्रभाग 13 (अ) गौरव ढेकळे, (ब) ज्योती चव्हाण यांनी 1 पक्षाकडून 2 अपक्ष अर्ज भरले. प्रभाग 15 (अ) मधून मनोज चौधरी यांनी पक्षाकडून व अपक्ष असे दोन अर्ज भरले. (ड) मधून मोहीत बालाणी यांनी पक्ष व अपक्ष असे दोन अर्ज भरले. 16 (अ) विश्वनाथ खडके, (ब-क) मधून साधना रोटे यांनी दोन, (ब) रंजना वानखेडे यांनी देखील पक्ष व अपक्ष (ब-क) मधून अर्ज भरले आहे. (ड) विजय वानखेडे, 17 (क) मधून शेख शहि शहिद शेख सादीक सादीक तर प्रभाग 18 (ब-क) मधून अनिता भापसे यांनी अर्ज भरले आहे.
रविवारी सुट्टी असल्याने सोमवार व मंगळवार दि.29 व 30 हा निवडणुकीचे नामनिर्देशित करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.हे मात्र निश्चित आहे.







