नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – (कुसुंबा) स्व. सौ. प्रतीक्षा ताई यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ ग्रुपतर्फे स्मृतिज्योत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्ध समाजप्रबोधक व प्रख्यात डॉ. वसंत हंकारे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्याना व्यसन, चुकीच्या सवयी आणि मुलामुलींच्या भावनिक निर्णयांमुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांबाबत त्यांनी अतिशय प्रभावी आणि जिव्हाळ्याने संवाद साधला.व्याख्यानादरम्यान डॉ. हंकारे यांनी नववी-दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त केली.
“आज मुलांच्या नकळत होणाऱ्या चुकीच्या वळणांमुळे अनेक पालकांना पोलीस स्टेशनचा रस्ता धरावा लागतो,” असे सांगत त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान दिले.
तसेच मुलींच्या आयुष्यातील भावनिक क्षणांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की–”पालकांनी काळजीपूर्वक वाढवलेल्या मुली एखाद्याच्या भूलथापांना बळी पडून प्रेमाच्या जाळ्यात अडकतात आणि परिस्थिती इतकी बिकट होते की त्याच मुली स्वतःच्या वडिलांविरोधात तक्रार देण्यापर्यंत पोहोचतात.”
या संवेदनशील कथनाने उपस्थित विद्यार्थिनी, विद्यार्थी तसेच पालकांची मने भारावून गेली. हंकारेंनी विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांच्या आई-वडिलांना स्टेजवर बोलल्यानंतर भावनिक वातावरण निर्माण झाले होते त्यावेळी अनेक आई-वडील व मुलांना अश्रू अनवर झाले.
🔴 या शिक्षक व शिक्षकेतरांचा झाला सन्मान 🔵

🔴 यांची होती उपस्थितीती 🔵
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्थेचे मनोज पाटील ,संस्थेच्या सचिव ज्योतीमाई मनोज पाटील,संचालक रामराजे पाटील तसेच विविध शाखांचे मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका उपस्थित होते. इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका . तनुजा मोती,माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका दिपाली भदाणे,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कामिनी पाटील,रायपूर स्वामी समर्थ विद्यालय मुख्याध्यापिका वैशाली धांडे,सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका दिपाली पाटील,आव्हाने माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका वैशाली शिंदे,आव्हाने प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका हर्षाली पाटील,आव्हाने येथील मनोजकुमार इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका मंजुषा सोनवणे,करंज येथील गंगाई इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका छाया पाटील तसेच सर्व शाखांतील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि कुसुंबा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







