नवराज्य लाईव्ह डिजिटल न्यूज नेटवर्क by (योगेश सुने)
जळगाव – ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. “नव्या-जुन्या पिढीला जोडणारा दुवा आपण गमावला,” अशा शब्दांत जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
धर्मेंद्र यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि तडफदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत अमिट छाप उमटवली होती. विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला. विशेषतः ‘शोले’मधील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात तितक्याच जोशाने जिवंत आहे. “शोलेसारखी निर्मिती क्वचितच होते; तो काळजाला भिडणारा अनुभव होता,” असेही जैन म्हणाले.
एक उत्कृष्ट अभिनेते असण्यासोबतच धर्मेंद्र यांनी लोकप्रतिनिधी म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. “त्यांच्या जाण्याने आपण एक महान कलाकार आणि उत्तम व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ही उणीव कायम भासेल,” असे अशोक जैन यांनी सांगितले.







