• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

फालीच्या इन्व्होशन सादरीकरणात मुंबई तर बिझनेस प्लॅनमध्ये बारामतीची शाळा प्रथम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 6, 2026
in जळगाव
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव, दि. ५ (प्रतिनिधी): “शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू हा माझा खरा पुरस्कार आहे,” असे माझे वडील श्रद्धेय मोठेभाऊ नेहमी सांगत होते. त्यांचा विचारांचा वारसा पुढे नेत, “आज विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि तेज पाहून भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीच्या याच विद्यार्थ्यांमधून घडतील, असा मला विश्वास वाटतो,” असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फाली (FALI) उपक्रमातील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना शुक्रवारी केले. त्यांच्या हस्ते फालीच्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन्स पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. 

जैन तंत्रज्ञानामुळे देशाच्या निर्यातील केळी फळ प्रथम

जैन इरिगेशनच्या पाईप, ठिबक सिंचन आणि टिश्यू कल्चर या तंत्रज्ञानामुळे जळगावसह देशातील केळी लागवडीत मोठी क्रांती घडल्याचे अशोक जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, जळगावातून सुरू झालेली केळीची लागवड आज संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक ते मणिपूरपर्यंत पोहोचली आहे. टिश्यू कल्चरद्वारे विकसित केलेल्या ‘ग्रँड नाईन’ जातीच्या केळीची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील वर्षी भारतातून सुमारे 4400 कोटी रुपयांच्या केळीची निर्यात झाली आहे. तर भारत देशाच्या फळांच्या निर्यातीमध्ये ऐतिहासिक विक्रम करून केळी फळाने यावर्षी प्रथम स्थान मिळविले आहे. जागतिक बाजारपेठेत भारताने पाच टक्के वाटा मिळविला असून २०४७ या अमृत काळात देशाची केळी निर्यात पाच पटीने वाढेल. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे ठिबक सिंचन, गुणवत्तापूर्ण रोपे देणारे टिश्यू कल्चर आणि शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणारे निर्यातक्षम तंत्रज्ञान यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वातावरण बदलामुळे वारावादळ व गारपिटीने दरवर्षी केळीचे मोठे नुकसान होते यावर मात करण्यासाठी केळी उत्पादनाचे (नवीन मॉडेल) तंत्रज्ञान विकसीत करणे हे आता काळाची गरज झाली आहे. आगामी काळात केळीच्या आणखी दोन नव्या जाती बाजारात आणण्याचे काम सुरू असून देशातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी टिश्यू कल्चर रोप उत्पादन क्षमताही वाढविण्यात येत असल्याचे अशोक जैन यांनी सांगितले.

फालीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, व्यासपीठावर अथांग जैन, नॅन्सी बेरी व इतर मान्यवर.( फोटो कॅप्शन )

 

फालीच्या कृषी इन्व्होशन सादरीकरणात ५३ तर कृषी बिझनेस प्लॅनमध्ये 53 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात पहिल्या आलेल्या पाच शाळांना पारितोषिक देण्यात आली. त्याचा निकाल

कृषी इन्व्होशन सादरीकरण – प्रथम- उदयचल हायस्कूल (विक्रोळी, मुंबई), द्वितीय- शारदाबाई पवार विद्यानिकेतन (शारदानगर, बारामती), तिसरा-मार्तंडराव पाटील कपगटे हायस्कूल (जंभाली , भंडारा), चौथा- रावजी फटे विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, (खराशी, भंडारा), पाचवा- न्यू इंग्लिश स्कूल (मोहपा, नागपूर) या शाळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

कृषी बिझनेस प्लॅन – प्रथम-शारदाबाई पवार विद्यानिकेतन (शारदानगर, बारामती), द्वितीय-पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय (अकुलखेडा, ता. चोपडा, जि. जळगाव), तिसरा क्रमांक- एस.एस.पाटील विद्यामंदिर (चहार्डी, चोपडा, जि.जळगाव), चौथा- कुलस्वामी खंडेराय विद्यालय, (हिवरे, जुन्नर, पुणे), पाचवा- उदयचल हायस्कूल (विक्रोळी, मुंबई) या शाळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

फालीच्या इन्व्होशन सादरीकरण आणि बिझनेस प्लॅनमधील विजेत्या विद्यार्थ्यांसोबत अशोक जैन, अथांग जैन, नॅन्सी बेरी व इतर मान्यवर.( फोटो कॅप्शन )

फालीचे विद्यार्थी कार्तिक कुमार (मुंबई), तनिष्का बडगुजर (बड़वानी, मध्य प्रदेश), शर्वरी चव्हाण (बारामती), सुज्ञा हडवळे (जुन्नर, पुणे) यांनी या उपक्रमातून काय शिकण्यास मिळाले, त्याबद्दल आपले अनुभव सांगितले. तसेच फालीचे माजी विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. त्यात कृतिका लकडे, अजिंक्य डोंगरे (गावडेवाडी जि. पुणे) यांचा समावेश आहे. डॉ. आर. एस. मसली (गोदरेज अ‍ॅग्रोवेट), मुनेश सक्सेना (आयटीसी), उपमा गोयल (स्टार मॅग्री), मिलकेश राठोड (प्रॉम्ट), सायली नागरे (अमूल) या कंपनी प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले. फालीच्या उपाध्याक्षा नॅन्सी बेरी यांनी भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. सीईओ शर्बोनी पोदार यांनी येत्या काही वर्षांत फालीचा विस्तार देशातील सर्व राज्यांमध्ये करण्याचा संकल्प व्यक्त केला. फालीच्या या उपक्रमास जैन इरिगेशनसह गोदरेज अ‍ॅग्रोवेट, युपीएल, स्टार अ‍ॅग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्पट, एसबीआय फाउंडेशन, अमूल आणि उज्जीवन या कंपन्यांचे सहकार्य लाभते.

*तिसरा टप्पा ७ जूनपासून*

फालीचा समारोपाचा तिसरा टप्पा ७ व ८ जून रोजी होणार आहे. त्यात ७ जून रोजी विद्यार्थी फिल्ड व्हिजीट करतील तसेच जैन इरिगेशनच्या शेती संशोधन व विकास केंद्रात शेती विषयक विविध प्रकल्पाची भेट देऊन प्रगतशील शेतकरी व जैन इरिगेशनच्या तज्ज्ञांशी संवाद साधतील. ८ जून रोजी बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन्सचे सादरीकरण होईल. त्यात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविले जाईल व १२ व्या फाली संमेलनाचा समारोप होईल.

बातमी शेअर करा !
Tags: अशोक जैनजैन इरिगेशनफालीफालीअधिवेशनशेती तंत्रज्ञानशेतीविषयक
Previous Post

मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

Next Post

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

June 5, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
रोड रोलरमधील इंधन संपल्याने बांभोरी गिरणा पुलावर वाहतूक कोंडी

रोड रोलरमधील इंधन संपल्याने बांभोरी गिरणा पुलावर वाहतूक कोंडी

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्ते व गटारींची कामे पूर्ण करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होईल!

पावसाळ्यापूर्वी रस्ते व गटारींची कामे पूर्ण करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होईल!

June 5, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif