नवराज्य Live न्यूज
जळगांव – दि.१८ (. )जळगांव शहरातील मुक्ताईनगर परिसरात ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज परशुराम जयंती निमित्त श्री परशूराम पालखी सोहळा भव्य स्वरूपात साजरा झाला.या प्रसंगी
श्री हनुमान मंदिर येथून सायंकाळी ६ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.तेथून ढोल ताश्याच्या गजरात लेझीम नृत्याचे उत्तम सादरीकरण करत श्री परशुरामाचा
जयजयकार करत ही शोभा यात्रा मिरवणूक प्रेम नगरातील श्री सप्त शृंगी मंदिरात पोहचली.रस्त्यात ठिकठिकाणी घरोघरी श्री परशुराम पालखीचे भव्य स्वागत केले जात होते..
या नंतर श्री सप्तश्रुंगी मंदिरात आयोजित कार्यक्रमात भगवान श्री परशुराम प्रतिमा पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.या प्रसंगी चिमुकले राम मंदिराचे प.पू.श्री दादा महाराज जोशी,जळगांव जनता बँकेचे सतीश मदाने, वेद पाठशाळा प्रमुख प.पू.श्री देवेंद्र गढीकर गुरुजी ,हभप मुकुंद महाराज धर्माधिकारी,शिवसेना जिल्हा उप संघटक मुरबाड तथा ब्राह्मण संघर्ष समिती समन्वयक सौ.अर्चना सुरडकर,भाजपा स्विकृत नगरसेवक सुभाष शौचे,ब्रह्मश्री संस्थेच्या संस्थापक महिला अध्यक्ष रेखाताई कुळकर्णी,अजय कुळकर्णी,पालखी प्रमुख प्रसाद पटवे , व्यासपीठावर विविध क्षेत्रतील मान्यवर उपस्थित होते.
व्यासपीठावरून समाज बांधवांना मार्गदर्शन करताना प. पू.श्री दादा महाराज यांनी सांगितले की ब्राह्मण समाज हा समाजाचा आरसा आहे..आदर्श आहे त्यांनी याचे भान ठेवून परिवारातील संस्कारा कडे कटाक्षाने लक्ष देवून योग्य असे आचरण केले पाहिजे,परिवार सक्षम,ज्ञानी, विनम्र सेवाभावी कसा होईल याकरता प्रयत्न केले पाहिजे सनातन धर्माचे पालन करून समाज संघटित होण्यासाठी कार्य झाले पाहिजे ,आपसी भेद भाव न बाळगता समाज एकसंघ होण्यासाठी,सुरक्षित होण्या साठी लक्ष देणे अपेक्षित आहे..







