• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जयंती

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम — प्रसाद पटवे गुरूजी

भगवान परशूराम पालखी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात,दि १८ व १९ एप्रिल रोजी उत्सव

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 17, 2026
in जयंती, जळगाव
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम — प्रसाद पटवे गुरूजी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज

जळगाव । ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था सर्व शाखिय ब्राह्मण समाज जळगावतर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भगवान श्री परशुराम पालखीत्सव उत्साहात साजरा होत आहे. शनिवार दि १८ व रविवार दि १९ रोजी हा सोहळा होणार असून या निमीत्ताने परिसरात भगवान परशूरामाची पालखी काढण्यात येणार असून या निमीत्ताने तयारी अंतिम टप्प्यात आली असून घराघरात भगवान परशूराम पोहचण्याचे उददीष्ट डोळयासमोर ठेवून उत्सवाची तयारी केली जात असून ती आता अंतिम टप्प्यात असल्याचे अध्यक्ष प्रसाद पटवे गुरूजी यांनी सांगितले.

भगवान परशुराम पालखी मिरवणूक (पालखी सोहळा) ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाची आणि भावनिक परंपरा आहे. ही मिरवणूक केवळ धार्मिक विधी नसून, ती भक्ती, परंपरा आणि समाजातील ऐक्याचे जिवंत प्रतीक आहे.या सोहळ्यात देव मंदिरातून बाहेर पडून नगरप्रदक्षिणा करतात. यामागील भाव असा की, देव स्वतः आपल्या भक्तांना भेटण्यासाठी त्यांच्या दारी येतात, त्यांना आशीर्वाद देतात आणि संपूर्ण गावात सकारात्मक ऊर्जा व चैतन्य निर्माण करतात. त्यामुळे हा सोहळा भक्तांसाठी एक अत्यंत आनंददायी आणि श्रद्धेचा अनुभव ठरतो.पालखी मिरवणुकीमागील एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे सर्व भक्तांना देवदर्शनाची संधी मिळावी हा आहे. विशेषतः वृद्ध, आजारी किंवा मंदिरात जाऊ न शकणार्‍या भक्तांसाठी ही एक मोठी संधी असते. पालखी त्यांच्या दारात येते आणि तेही देवाच्या सान्निध्यात येतात.याशिवाय, पालखी मिरवणूक गावातील वातावरण भक्तीमय व पवित्र बनवते. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि भजन-कीर्तन यांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. हा सोहळा एक सामुदायिक उत्सव बनतो, ज्यात सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतात.

वारकरी संप्रदायातील आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या पालखी परंपरा शतकानुशतके चालत आल्या आहेत. या परंपरा संत आणि भक्त यांच्यातील नात्याची साक्ष देतात आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करतात.काही ठिकाणी, विशेषतः शिमगा किंवा होळीच्या सणात, पालखी मिरवणूक ही चांगल्या शक्तींचा वाईट शक्तींवर विजय दर्शवणारे प्रतीक म्हणूनही साजरी केली जाते.थोडक्यात, पालखी म्हणजे देवाचे लोकांमध्ये ‘प्रस्थान’ होय. हा सोहळा भक्ती, आनंद, एकात्मता आणि संस्कृतीचा संगम घडवणारा एक अद्वितीय अनुभव आहे.ब्राह्मण समाजाचे प्रेरणास्थान भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव व पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे साजरा करत आहोत.

स.न. शनिवार दि.१८/०४/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हनुमान मंदिर (एस.एम.आय.टी कॉलेज जवळ) येथून पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी टाळ-मृदुंग, डील व लेझीम पथकासह शोभयात्रा श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर, प्रेम नगर येथे सांगता होईल. रविवार दि.१९/०४/२०२६ रोजी श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर येथे सकाळी ७.०० वाजता भगवान परशुरामाच्या मुर्तीला अभिषेक, आरती व पुजन केले जाईल व सायंकाळी श्रीभगवान परशुराम शोभायात्रेच्या मिरवणुकीत पालखी सामील होईल.

 

या साठी आमचे स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेवून आपल्यापर्यंत पोहोचतीलच, तरीही हेच अधिकृत निमंत्रण समजून सर्वांनी उपस्थित राहावे.आपल्या सहभागातून ब्राह्मण एकता वाढवूया, असे आवाहन अध्यक्ष प्रसाद पटवे व समस्त ब्रह्मश्री परिवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जयंतीजळगावन्यूजपरशुराम
Previous Post

दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश!!!

Next Post

क्रिकेटचा महा-थरार ; ‘जळगाव क्रिकेट लीग –२०२६’!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
क्रिकेटचा महा-थरार ;  ‘जळगाव क्रिकेट लीग –२०२६’!

क्रिकेटचा महा-थरार ; ‘जळगाव क्रिकेट लीग –२०२६’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif