
नवराज्य Live न्यूज नेटवर्क
भडगाव – शेतकी संघाचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, नियोजनशून्य व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर उभे राहून आपल्या हक्कासाठी झुंज द्यावी लागत आहे. ज्वारी व मका खरेदीसाठी टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पहाटे चार वाजल्यापासून रांगा लावाव्या लागत असून, दुसऱ्या दिवशीही हीच दयनीय परिस्थिती कायम असल्याने संताप उफाळून आला आहे. व कोणते काम नव्हता निराशा आपल्या सोबत घेऊन खाली हाताने घरी परतावे लागल्याचा संताप व्यक्त करत शेतकरी माघारी परतले. व आज पहाटेचे चार वाजेपासून

भडगाव–पाचोरा मार्गावर शेकडो शेतकरी जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला उभे राहत नंबर लावत होते. कुठलीही शिस्त, कुठलेही नियोजन नसल्याने परिस्थिती पूर्णपणे बेकाबू झाली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागला, हीच संघाच्या अपयशाची जिवंत साक्ष ठरली.
या गोंधळात शेतकी संघाचे चेअरमन व संचालक मंडळ घटनास्थळी उपस्थित होते; मात्र संतप्त शेतकऱ्यांची गर्दी वाढताच त्यांनी जबाबदारी झटकून काढता पाय घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.

उन्हात तासनतास उभ्या असलेल्या महिला व पुरुष शेतकऱ्यांच्या भावना पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचा संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “रक्ताचे पाणी करून पिकवलेला माल विकायलाही आम्हाला अशी वागणूक?” असा जळजळीत सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी विद्यमान चेअरमनच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होत असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून जबाबदार अधिकाऱ्यांनी कारवाई करावी व खरेदी प्रक्रियेत पारदर्शक व शिस्तबद्ध व्यवस्था उभी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
विद्यमान शेतकी संघ चेअरमन यांची संतप्त शेतकरी वर्गाकडून राजीनाम्याची मागणी. व नियोजनबद्ध सुरळीत कामकाजाची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी.







