नवराज्य Live न्यूज नेटवर्क
अमळनेर – तालुक्यातील चांदणी कुहे येथील रेल्वे अंडरपास बोगद्यात पाणी आणि चिखल साचलेला असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रेल्वे प्रशासनचे सतत दुर्लक्ष होत आहे. रेल्वे गेट चे अडथळे दूर होऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे सात कोटी खर्चुन अमळनेर जळगाव रस्त्यावर कुहे गावाजवळ रेल्वे रुळाखाली अंडरपास बोगदा बांधण्यात आला आहे. मात्र रेल्वे प्रशासनचे नियोजन चुकले आहे. या बोगद्यात पावसाळ्यात पाणी साचून अनेकदा वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडले आहेत. पाणी साचले असल्याने बोगद्यातील रस्त्याचे खड्डे वाहनचालकाना दिसत नसल्याने अपघात होतात.
वाहनांचे नुकसान होते. पावसाळा संपून दीड दोन महिने झाले तरी बोगद्यात पाणी साचले आहे. पाणी साचून राहिल्याने चिखल देखील झाला आहे. परिणामी वाहन घसरून देखील अपघात होत आहे. बोगद्यातील पाणी काढण्यासाठी रेल्वे प्रशासनने ठेका दिला आहे मात्र ठेकेदार पाणी काढत नाही. काढलेले पाणी
🔴 या मार्गातून लोकप्रतिनिधी दररोज करतात ये.. जा…
ज्याप्रमाणे दररोज नागरिकांना या बोगद्यातून ये जा करत असताना त्रास सहन करावा लागतो. त्याच पद्धतीने या मार्गातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा ये जा करत असतात. त्यांना देखील हा, त्रास होतच असेल ना तरी देखील या बोगद्याची समस्या का सुटत नाही असा संताप जनतेतून व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याकडे रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे असा सूर निघत आहे







