• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ आणि ‘आत्मध्यान’ आवश्यक

आत्मोत्कर्ष वाणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 26, 2025
in जळगाव, आध्यत्मिक
जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ आणि ‘आत्मध्यान’ आवश्यक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

|| *आत्मोत्कर्ष वाणी* ||

जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ आणि ‘आत्मध्यान’ आवश्यक

प्रत्येकाच्या जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ (त्याग) आणि ‘आत्मध्यान’ हे आवश्यक आहे. या गोष्टी असतील तरच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. सुंदर सजावट केलेले आकर्षक पाकीट असेल, पण त्यात मोलाचा संदेश नसेल तर ते पाकीट व्यर्थ ठरते. या पर्युषण महापर्वात आध्यात्मिक ज्ञान मिळवून आत्मोत्कर्ष साधावा. अज्ञानी असणे हा उपहासाचा विषय आहे, तर ज्ञानी असणे ही सन्मानाची बाब आहे. पदोपदी ज्ञान मिळवत राहावे. राजगुरुमाता प. पू. उमरावकुंवरजी ‘अर्चना’ म.सा. यांनी जीवनात ध्यानाला विशेष महत्त्व दिले. आचार्य प. पू. शिवमुनी यांनी देखील ‘ध्यानाला’ खूप महत्त्व दिले आहे. आत्मध्यान केल्याने आत्मोत्कर्ष साध्य होतो. हे सांगताना दैनंदिन जीवनातील प्रेरक उदाहरणे देत नियम, व्रत, प्रत्याख्यान आणि ध्यानाचे महत्त्व श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तिनी प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी आजच्या धर्मप्रवचनात सांगितले.

सुरुवातीला प. पू. डॉ. उदितप्रभाजी म.सा. आणि प. पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांचे विचारप्रवण, प्रेरणादायी प्रवचन झाले. सुरू असलेला हा पर्युषण महापर्व आत्म्याची मॉलिश आणि पॉलिश करण्याची संधी घेऊन आला आहे. गतीसह प्रगती करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असावे. ‘प्रगती’ आणि ‘गती’ या दोन्ही संकल्पना यावेळी समजावून सांगण्यात आल्या. ‘जिथे चरण (चक्र), तिथे गती आणि जिथे आचरण, तिथे प्रगती’ ही बाब उदाहरणासह सांगण्यात आली. यासोबतच, संवत्सरीला कुणाशी कितीही विवाद किंवा मतभेद झाले असले, तरी त्याची क्षमा मागून ते संपवावे किंवा आपणच त्यांना क्षमा करावी. ‘सॉरी’ हा मोलाचा शब्द मन स्वच्छ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो, असा मोलाचा संदेश देण्यात आला. तसेच, सकारात्मक विचार म्हणजे ‘धर्म’ आणि नकारात्मक विचार ‘अधर्म’ मानले जाते. प्रत्येकाने सकारात्मक विचार करत राहावे. प्रतिकूल-अनुकूल, सुख-दुःख या परिस्थितीतून जावेच लागते. कोणतीही परिस्थिती असो, चांगलाच विचार करावा. डोके शांत ठेवावे; गरम डोके असेल तर व्याधी जडतात. मंथरासारखे नकारात्मक विचार कधीच करू नये. विचारांमध्ये स्पष्टता ठेवावी. उद्या ‘क्षमा’ याचना करा आणि इतरांना क्षमा करा, असे आवाहनही करण्यात आले.

 

ऑगस्ट २६: २०२५

जळगांव – महाराष्ट्र.

(शब्दांकन – किशोर कुळकर्णी.)

बातमी शेअर करा !
Previous Post

भांडी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड  

Next Post

इम्पिरियल विद्यार्थी गणेश मंडळाने केले जल्लोषात गणेशाचे स्वागत

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इम्पिरियल विद्यार्थी गणेश मंडळाने केले जल्लोषात गणेशाचे स्वागत

इम्पिरियल विद्यार्थी गणेश मंडळाने केले जल्लोषात गणेशाचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif