• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेतीकडे वाटचाल करावी – पंडित अण्णा शिंदे 

जलसंधारण मंत्रालय आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने समृद्धीची पाठशाला या उपक्रमात मान्यवरांनी दिले शेतकऱ्यांना धडे.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 7, 2026
in जळगाव, कृषी
शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेतीकडे वाटचाल करावी – पंडित अण्णा शिंदे 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्यLive न्यूज नेटवर्क

 जळगाव –  बदलत्या   हवामानात जलसंवर्धन व आधुनिक सिंचन तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आधार शेतकरी जलदूत समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे यांनी केले ते केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालय आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘समृद्धी की पाठशाला’. या शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

या उपक्रमात वाघूर डावा कालवा आसोदा-भादली परिसरातील शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली. एमसीएडी समृद्धी योजनेंतर्गत नशिराबाद येथे आयोजित या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जलसंधारण विभागाचे प्रकल्प संचालक अशोक जेएफ यांनी प्रेशरयुक्त पाइप सिंचन प्रणालीमुळे पाण्याची वाहतूक अधिक कार्यक्षम होत असल्याचे सांगितले. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता गोकूळ महाजन, कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ बी.डी. जडे तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी

आदी उपस्थित होते.

पाणी बचत व पाणी व्यवस्थापनाचे उपाय

उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम व नियोजनबद्ध वापर करून अधिक उत्पादन कसे घेता येईल, पाणी बचत व पाणी व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा असून, आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करता येते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांची प्रश्न उत्तर

  या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी. शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध होत नाही अशी व्यवस्था आहे का? असा प्रश्न केला. यावर तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन यांनी उत्तर देताना, प्रेशराईज सिस्टीमने पाणी उपलब्ध होईल यासाठी शेतकऱ्यांनी मागणी करणे आवश्यक आहे असे सांगितले.

शेतकऱ्यांना चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली, तर पाठशाळेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तरातून तज्ज्ञांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Tags: आधुनिकसिंचनजलसंवर्धनजळगावपाणीबचतशेतकरीकार्यशाळासमृद्धीकीपाठशाळा
Previous Post

मनभावन कॅराओके क्लबचे उत्साहात उद्घाटन!

Next Post

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 19, 2026

जळगावमध्ये QR कोड कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर उपमहापौर मनोज चौधरी यांचा सवाल

June 19, 2026

जळगावातील बिस्मिल्ला चौकात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात

June 19, 2026

जैन हिल्स येथे“फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाची राष्ट्रीय

June 19, 2026
महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif